Diplomacy / Foreign Affairs

भारताचे परराष्ट्र धोरण आणि जयशंकर यांची आगामी केनिया भेट

 भारत कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना जगभरातील सुमारे ४० देशांनी काहींना काही मदत पाठविली. मदतीचा हात पुढे करण्यास इच्छुक असलेल्या देशांमध्ये केनियाचे नाव बघून मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या. केनियाने चहा, कॉफी आणि शेंगदाण्याच्या स्वरूपात १२ टन मदत पाठवल्यानंतर आश्चर्य, अविश्वास अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. केनियासारखा आफ्रिकन देश भारतासारख्या मोठ्या देशाला मदत पाठवू शकेल अशी अनेकांना अपेक्षा नव्हती. काहींनी या मदतीची चेष्टा केली तर अनेकांनी त्याला सुदाम्याचे पोहे वगैरेची उपमा दिली

Read More

भारतीय लष्कराच्या मदतीशिवाय स्वातंत्र्य मिळविणे शक्यच नव्हते :- बांगलादेशी शिष्टमंडळ.

ज्या तातडीने आम्ही स्वतंत्र झालो ते भारतीय लष्कराच्या मदतीशिवाय शक्यच नसल्याचे' उद्गार भारत भेटीवर आलेल्या बांगलादेशी शिष्टमंडळाच्या सदस्यांनी शनिवारी काढले. 'आम्ही भारतीय लष्कराच्या प्रति कृतज्ञ' असल्याचेही त्यांनी नमूद केले. बांगलादेशच्या खासदार काझी रोझी यांनी 'बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील भारतीय लष्कराचा वाटा आम्ही विसरलो नसल्याचे' सांगताना भारताचे आभार मानले. त्या म्हणाल्या,"पूर्व पाकिस्तानातील जनता स्वातंत्र्यासाठी झगडत असताना भारतातर्फे आम्हाला सर्वोतोपरी मदत करण्यात आली होती".

Read More